भक्तांन मार्फत देणगी स्वीकारली जाईल. खाते क्र. :- 36211720207 आय. एफ. एस. सी.:- SBIN0003796(स्टेट बँक ऑफ इंडिया) अंतर्गत आयकरात वजावट - Tech/80G/294/2017-18/6919

॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥ ॥ दत्तात्रय जनार्दन श्रीएकनाथ ॥

वाङ्‍मय

वाङ्‍मयाविषयी

संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीची पहिली अस्सल शुद्ध आवृत्ती लोकांपुढे आणण्याचे श्रेय संत एकनाथ महाराजांना दिले जाते. त्यामुळे मराठी भाषेचे पहिले संपादक होण्याचा मान संत एकनाथांना मिळतो. ते ’एका जनार्दन’ म्हणून स्वतःचा उल्लेख करतात, एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे. संत एकनाथांनी बहुजनांच्या उद्धारासाठी आपली लेखणी झिजवली. संस्कृतातील ज्ञान मराठीत यावे यासाठी प्रयत्न केले. संस्कृत भाषेऐवजी मराठी भाषेचा सहेतुक आग्रह धरला. भागवत ग्रंथावर मराठीतून टीका लिहिली.

संत एकनाथी भागवत, हे वारकरी संप्रदायात महत्त्वाचे मानले जाते. यासह भावार्थ रामायण, अभंगरचना, भारूड अशी विविधतापूर्ण रचना त्यांनी केली आहे. त्यांची आख्यानपर रचना , ‘रुक्मिणीस्वयंवर' ही मनाला अतिशय भावते. भारूड हा प्रकार संत एकनाथांनी मराठी भाषेला दिला.

उत्तर काशीतील विद्वान पंडितांच्या नि लाखो श्रोत्यांच्या पुढाकारानं एकनाथी भागवत ग्रंथाची हत्तीवरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. रस्त्या रस्त्यावर काशीकरांनी पैठणच्या नाथांच्या भागवत ग्रंथावर प्रेमपूर्वक पुष्पवृष्टी केली. नाथ पैठण ला पोहोचल्यावर पैठण नगरीतही भव्य अशी ग्रंथ मिरवणूक काढण्यात आली.


श्रीएकनाथी भागवत

श्री एकनाथी भागवत हा ग्रंथ म्हणजे वारकरी संप्रदायातील प्रमुख तीन ग्रंथापैकी एक होय. संस्कृतमधील भागवत पुराणाच्या एकादश स्कंधावरील ही ओवीबद्ध मराठी टीका आहे. त्याची रचना सुमारे इ.स. १५७० ते इ.स. १५७३ या काळात झाली. एकनाथी भागवत ग्रंथाची काशीमध्ये हत्तीवरून भव्य मिरवणूक काढण्यात आली.


ज्ञानेश्वरीचे प्रतशुद्धीकरण

संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीची पहिली अस्सल शुद्ध आवृत्ती लोकांपुढे आणण्याचे श्रेय संत एकनाथ महाराजांना दिले जाते. त्यासाठी त्यांनी असंख्य त्यामुळे मराठी भाषेचे पहिले संपादक होण्याचा मान संत एकनाथांना मिळतो. त्याची रचना सुमारे शके १५०६ या काळात झाली.


रुक्मिणीस्वयंवर

एकनाथांचे रुक्मिणीस्वयंवर हे वारकरी संप्रदायातील पहिले आख्यानक कथा काव्य आहे. नाथांचा हा ग्रंथ लोकप्रिय ठरला तो त्याच्या रुपकात्मक भाषेने आणि सुटसुटीतपणानं, लिहून पूर्ण केला. नाथांच्या रुक्मिणीस्वयंवराने आख्यानकाव्याची एक नवी परंपरा मराठीत नि‍र्माण झाली.

श्रीखंडयाचे लग्न लावावे अशी नाथांच्या पत्नी गिरिजाबाई यांची इछा होती. ही इछा आपण वाड्‍मयरुपात पूर्ण करावी असे नाथांना वाटले. शके १४९३ साली काशीक्षेत्री रामनवमीच्या दिवशी रुक्मिणीस्वयंवर हा ग्रंथ त्यानी लिहुन पुर्ण झाला.


चतु:श्र्लोकी भागवत

हा एकनाथांचा ओवीबद्ध मराठीतील पहिला ग्रंथ आहे. गुरूगृही असताना म्हणजे अगदी तरुण वयात नाथांनी लिहिलेला आहे. तरी रचना अगदी भारदस्त, भाषा गांभीर्ययुक्त, वेचन अधिकारयुक्त वाटते. संस्कृतातील ज्ञान सर्वसामान्यांपर्यन्त मराठीत पोचावे ह्यासाठी श्रीगुरु जनार्दन स्वामींच्या आज्ञेने इ.स. १५५१ च्या सुमारास नाथांनी हा ग्रंथ त्र्यंबकेश्वर क्षेत्री पूर्ण केला.